शिक्षणानं ‘ज्ञान’ मिळेल, त्याचं शहाणपणात’ आणि शहाणपणाचं ‘विशाल दृष्टीत’ रूपांतर यायला हवं
प्रामाणिकपणे यश संपादन करणं, त्यासाठी जिद्द चिकाटीनंच पुढे जाता येईल. शिक्षणानं ‘ज्ञान’ मिळेल, पण त्या ज्ञानाचं रूपांतर ‘शहाणपणात’ करता यायला हवं. आणि शहाणपणाचं ‘विशाल दृष्टीत’. ही विशाल दृष्टी ‘मी’ च्या पलीकडे जायला हवी. मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं, हे जास्त महत्त्वाचं आहे. समाजाप्रती सदैव ‘कृतज्ञ’ रहायला हवं. जीवन आनंदानं, उत्साहानं जगायला शिकलं पाहिजे.......